MARI MARI JAY SARIR – मरी मरी जाय सरीर

SKU: 9936
Publisher:
Our Price

140.00

Product Highlights

योजनाची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण / संघर्ष सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंबं कवितेमध्ये उमटत रहातात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था ह्या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते.

Quantity:
in stock
Category: