₹130.00
लग्न झालं तेव्हा प्राणेशाचार्य सोळा वर्षांचे, बायको भागीरथी बारा वर्षांची. तशी ती जन्मापासून आजारीच. पण संन्यस्त वृत्तीने जगावे ही लहानपणापासूनची खुमखुमी. किती सरळ, मायाळू, रूपवान, उंचापुरा, तेजस्वी माणूस; पण बिचा-याला स्त्रीसुख म्हणजे काय चीज आहे, याची कल्पनाही नाही. एकटाच झोपतो ओंडक्यासारखा. शरीर जर्जर झाल्यानंतर `काम` सोडून जातो; परंतु करुणा? आचार्यांना वाटलं `कामा`पेक्षा करुणा कितीतरी मोठी शक्ती. अशी करुणा आपल्यात नसती तर लग्नापासून अंथरूण धरलेल्या बायकोची अशी सेवा केली असती का? एखाद्या परस्त्रीच्या आहारी गेलो नसतो का?