₹200.00
अंग देशाच्या राजाकडून ब्राह्मणांचा अवमान झाल्याने समस्त ब्रह्मवृंद देश सोडून गेला. त्यामुळे राज्यात अवर्षण पडले. ऋश्यशृंग देशात येतील तर हे अवर्षण दूर होईल, असे इंद्रांनी अंग देशाचे राजे रोमपाद यांना सांगितले. रोमपादांनी काही गणिकांना पाठवून ऋश्यशृंग यांस आपल्या राज्यात आणले. त्याबरोबर भरपूर पर्जन्यवृष्टी होऊन राज्यातले अवर्षण दूर झाले. यामुळे कृतज्ञ होऊन रोमपादांनी आपली शांता नामक कन्या (वास्तविक ही दशरथाची पुत्री आहे.) ऋश्यशृंगास दिली. एक पुत्र होईपर्यंत ऋश्यशृंग अंग देशात राहिले. तदनंतर शांतेसह ते आपल्या आश्रमात परतले.