₹650.00
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक – सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.