₹120.00
नशीब आणि प्रारब्ध हे नेहमीच वादातीत विषय मानले जातात. बरेच प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा नशिबाला आपण खुशाल दोष देऊन मोकळे होतो. पण खरंच नशीब घडवता येतं का? नशिबाला दोष देणं योग्य आहे का? यशस्वी लोकांच्या नशिबातच यश लिहिलेलं असतं का? ह्या प्रश्नांची उत्तरं मला माहीत नाहीत, पण नशीब घडवण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते दृष्टिकोन अंगीकारायला पाहिजेत, कशावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी धाडस करायला पाहिजे, कोणती कौशल्यं शिकायला पाहिजेत हे मला कळलेलं आहे. ते मी ह्या पुस्तकात माझ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. तुम्ही जर हे वाचलंत, तर तुमचंही नशीब त्यामुळे बदलून जाईल.