UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADTALANI – उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी
₹160.00
Product Highlights
’उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी’ हा अ. वा. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकात उपयोजित समीक्षेच्या व्याखेसह तिची सोदाहरण चर्चा त्यांनी केली आहे. गंगाधर गाडगीळांच्या साहित्यकृतींवर झालेल्या समीक्षेचा आढावा घेणारा लेख या संग्रहात आहे. प्रसिद्ध नाटकांची समीक्षा करताना ते गडकरी आणि तेंडुलकर, या दोन टोकांना भिडताना दिसतात. तर कादंबरी विभागात भिन्न बाजाच्या कादंबर्यांचं विश्लेषण करतात. जसे ’झोंबी’ (डॉ. आनंद यादव, ’शापित’(अरुण साधू) इ. कथा या साहित्य प्रकारात ’सतरावे वर्ष’ या पु. भा. भावे यांच्या कथेचं आकलन ते मांडतात. ’सय’ या वि. शं. पारगावकरांच्या ललित निबंध संग्रहाचा अभ्यासपूर्ण धांडोळा ते घेतात, तर ’आहे मनोहर तरी…’ या सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राची सखोल चिकित्सा करतात. ’विंदा करंदीकरांची गझलरचना’ या लेखात गझलचा रचनेच्या दृष्टीने ते विचार करतात आणि ’केशवकुमारांचे काव्यलेखन’ या लेखांतून केशवकुमारांच्या विडंबनात्मक काव्याची वैशिष्ट्ये नोंदवतात. तर असा हा संग्रह अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त तर आहेच, पण सर्वसामान्य वाचकांनीही वाचावा असा आहे.
Description
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADTALANI IS A COLLECTION OF CRITICAL ARTICLES WRITTEN BY A. V. KULKARNI. IN THE PREFACE OF THIS BOOK HE HAS DISCUSSED PLANNED CRITICISM WITH ITS DEFINITION AND EXAMPLES. THE SUMMARY OF CRITISISM ABOUT GANGADHAR GADGIL’S LITERATURE INCLUDED IN THIS COLLECTION. CRITISISING FAMOUS PLAYS, HE TOUCH THE ENDS LIKE GADKARI AND TENDULKAR. IN THE NOVEL SEGMENT, HE ANALYSE THE NOVELS OF DIFFERENT FORMS. FOR EXAMPLE, `ZOMBI` (DR. ANAND YADAV), `SHAPIT` (ARUN SADHU) ETC. IN THE SECTION OF STORY HE HAS INTERPRETED THE STORY ‘SATARAVE VARSH’ WRITTEN BY P.B. BHAVE. DISCUSSING ABOUT ARTISTIC ESSAYS, HE TAKES A DETAIL REVIEW OF ‘SAY’ WHICH IS WRITTEN BY V. S. PARGAONKAR. HE ALSO CRITISISE DEEPLY THE AUTOBIOGRAPHY OF SUNITA DESHPANDE ‘AHE MANOHAR TARI.’ IN THE ARTICLE ‘VINDA KARANDIKARANCHI GAZALRACHANA’ HE HIGHLIGHTS THE GAZAL ACCORDING TO PRESENTATION. HE MENTION THE CHARACTERISTICKS OF KESHAVKUMAR’S POETS IN ARTICLE ‘KESHAVKUMARANCHE KAWYLEKHAN.’ IN ALL, THIS COLLECTION IS USEFUL FOR STUDENTS OF LITERATURE AND ALSO READABLE FOR GENERAL READERS.
Brand
DR. ARVIND VAMAN KULKARNI
Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003
डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास – इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ठांथ आहेत. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंठाह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ठांथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ठांथ इ. त्यांची ठांथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अठास्थानी होते. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कवितासंठाहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ठांथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.

Reviews
There are no reviews yet.