MALYACHI MATI – माळ्याची माती
₹100.00
Product Highlights
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुÂटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार
Description
LIKE SIMILES AND METAPHORS, YADAV’S POEMS SPEAK THE LANGUAGE OF IMAGERY. THENCE IS BORN A ROBUST POEM LIKE ‘SAPNA PADTYAAT’. CLODS OF EARTH FIND FEET, TURN THEIR BACKS AND START WALKING. THEY ACQUIRE EYES LIKE THE LUSTROUS, MOIST ONES OF BULLOCKS. WITHIN HIDES A STORY. THE CLODS CANNOT SPEAK, SO THEY SHED SILENT TEARS THROUGH SHUT EYES. YADAV’S POETRY DOES NOT REVEAL THE ANGST BROUGHT ON BY HARDSHIPS AND POVERTY; NOR HAS IT TAKEN BIRTH TO DISPLAY THE PENURIOUS AND POVERTYSTRICKEN VILLAGE LIFE FOR ALL TO SEE, IN THE NAME OF SOCIAL AWARENESS. RATHER, THE TRAVAILS AND TRAGEDIES OF THAT LIFE ARE AS MUCH A PART OF HIS EXPERIENCES, AS ARE THE BEAUTY OF THE LUSCIOUS, SWAYING FIELDS FULL OF GRAIN, AND THE FEELINGS AND LIVES OF THOSE HARDWORKING FOLK. AND THEREFORE ONE GETS A GENUINE AND PROPER INSIGHT INTO RURAL LIFE THROUGH THIS SMALL COLLECTION OF POEMS. ANURADHA POTDAR.
Brand
ANAND YADAV
Birth Date : 30/11/1935
Death Date : 27/11/2016
साहित्य अकादमी पुरस्कार, गिरणागौरव पुरस्कार नाशिक, सन्मानित साहित्यिक कालीमाता साहित्य पुरस्कार, परिमल लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राज्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण पुरस्कार, रा. ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. ग्रामीण साहित्यविषयक चळवळीला त्यांनी १९७४ पासून प्रारंभ केला. केवळ विनोद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील व्यथा, वेदना, त्यांची भीषण सुखदु:ख त्यांनी जगासमोर मांडली. १९८०पासून आजतागायत अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. साहित्यक्षेत्राशी संबंधित अनेक मंडळे, समित्या यांचे ते सदस्य आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. आनंद यादव यांच्या अनेक साहित्यकृतींचे हिंदी, बंगाली, उर्दू, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील मराठी विषय असलेल्या विद्यापीठांतून त्यांच्या पुस्तकांचा साहित्यकृतींचा, अभ्यास सातत्याने केला जातो. तसेच क्रमिक, पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्यकृतींचा सातत्याने समावेश केला जातो. झोंबी हे त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय झाले आहे. या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Reviews
There are no reviews yet.