LETS KILL GANDHI ! – लेट्स किल गांधी !
₹695.00
Product Highlights
३० जानेवारी १९४८ रोजी, नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचे पितामह महात्मा गांधी यांचा एका हिंदू अतिरेक्याने वध केला़ त्यानंतरच्या काळात अनेक असत्य गोष्टी सत्य ठरवण्यात आल्या़ काही अर्धसत्यांचे वास्तविक हकिकतींमधे मिश्रण करून त्या गोष्टी पूर्ण सत्य म्हणून खपवण्यात आल्या़. ‘‘भारताच्या फाळणीस गांधीच जबाबदार होते,’’ ‘‘गांधींनी मुसलमानांना आसरा दिला आणि हिंदूंना वा-यावर सोडले,’’ ‘‘गांधींना ठार करणे हाच भारताला वाचवण्याचा एकमेव मार्ग होता़’’ गांधी हत्येचं समर्थन करण्यासाठी हिंदू अतिरेकी व गोडसेच्या अनुयायांकडून तेव्हा अशी अनेक विधाने केली गेली आणि आजही केली जातात़ सर्व काही हकिकत अत्यंत खरेपणाने मांडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे़ गांधीजींचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात अनेक इतिहासकालीन नोंदी, गांधी खून खटल्याचा वृत्तान्त, बचाव पक्षाचे वकील आणि न्यायाधीशांनी लिहिलेली पुस्तके, वर्तमानपत्रातील अहवाल, अनेक जणांशी केलेली तोंडी चर्चा व तुषार गांधींनी लहानपणापासून घरी ऐकलेल्या हकिकती यांचा आधार घेण्यात आला आहे़. राजकीय हत्यांच्या आजवरच्या इतिहासात, कामकाजातील ढिसाळपणा, मानवी चुका आणि संपूर्ण बेपर्वाई दाखवूनही कामचुकार अव्यावसायिक अधिकारी वर्ग बिनधास्तपणे दोषारोपातून सुटल्याचे दुसरे उदाहरण नसेल़ हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे़.
Description
ON 30 JANUARY 1948 MAHATMA GANDHI, FATHER OF A NEWLY LIBERATED INDIAN NATION, WAS MURDERED BY A HINDU EXTREMIST. SINCE THEN, MANY LIES HAVE BEEN PASSED OFF AS TRUTHS, HALF-TRUTHS HAVE BEEN MIXED WITH TRUE INCIDENTS AND PASSED OFF AS WHOLE TRUTHS. GANDHI WAS RESPONSIBLE FOR THE PARTITION ; GANDHI SHELTERED MUSLIMS AND ABANDONED HINDUS ; KILLING GANDHI WAS THE ONLY WAY TO SAVE INDIA ; THESE WERE, AND EVEN TODAY ARE, SOME OF THE STATEMENTS PROPAGATED BY HINDU EXTREMISTS AND FOLLOWERS OF GODSE TO JUSTIFY GANDHI S MURDER.
Brand
TUSHAR GANDHI
तुषार अरुण गांधी (जन्म:१७ जानेवारी, १९६० मुंबई येथे) हे महात्मा गांधींचे पणतू आणि पत्रकार अरुण गांधी यांचे सुपुत्र आहेत़ मुंबई आणि कोलकाता याच्या दरम्यान गाडीतच त्यांचा जन्म झाला़ त्यांचे बालपण सांताक्रूझमध्ये गेले. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली़ १९९६ मध्ये कटक येथील बँक ऑफ इंडियाच्या तिजोरी मध्ये चुकून राहिलेला महात्मा गांधींचा रक्षाकलश सापडला़ सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने त्यांनी या कलशाचे त्रिवेणीसंगमात ३० जानेवारी १९९७ रोजी विसर्जन केले़ त्याच वर्षी त्यांनी महात्मा गांधी प्रतिष्ठानची स्थापना केली. ते या प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आहेत़ लेट्स किल गांधी या पुस्तकात त्यांनी महात्माजींच्या वधासाठी ब्राह्मणांना दोष दिला़ टीकाकारांच्या मते या पुस्तकामुळे सर्वच ब्राह्मणांची बदनामी झाली आहे़ तुषार गांधी मात्र ठामपणे म्हणतात, की त्यांनी केलेले दोषारोप सर्व ब्राह्मणांना नव्हे, तर केवळ सतत माझ्या पणजोबांच्या जिवावर उठलेल्या पुण्यातील ब्राह्मणांच्या एका विशिष्ट गटाला उद्देशून आहेत़ २००५ साली त्यांनी दांडीयात्रेच्या ७५ व्या स्मरणदिनी पुन्हा एकदा २४१ मैलांची दांडीयात्रा काढली़ त्यांच्याच प्रयत्नांमुळे दांडीयात्रेचा साबरमती ते दांडीचा हा मार्ग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा ठरवण्यात आला़ तुषार यांचे सध्या वास्तव्य मुंबई येथे पत्नी सोनल, मुलगा विवेन व मुलगी कस्तुरी यांच्या समवेत आहे.

Reviews
There are no reviews yet.